जिद्दीचा खाकी विजय! शेतकऱ्याच्या मुलाने गडचिरोलीत फौजदार पद मिळवले

जिमलगट्टा (जि. गडचिरोली) : साध्या शेतकरी कुटुंबातील एका तरुणाने अथक मेहनत आणि जिद्दीच्या बळावर महाराष्ट्र पोलीस दलात फौजदार (पोलीस उपनिरीक्षक) पद मिळवून विदर्भात अभिमान आणि प्रेरणेची लहर निर्माण केली आहे. समय्या मोगलीवर यांच्या या यशाने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

बालपणी जिल्हा परिषद शाळेत शिकत असतानापासून खाकी वर्दी घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्या समय्या यांना आर्थिक अडचणी आणि ग्रामीण पार्श्वभूमीमुळे अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. २०१९ च्या पहिल्या प्रयत्नात अपयश आले तरी हार न मानता त्यांनी मेहनत चालू ठेवली. अखेर २०२३ मध्ये महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षेत त्यांची निवड झाली.

विशेष म्हणजे, समय्या यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षाही उत्तीर्ण केली होती, परंतु त्यांचे एकच ध्येय होते – खाकी वर्दी. त्यामुळे त्यांनी फौजदार पद स्वीकारले. त्यांच्या यशामागे आई-वडिल, कुटुंबीय आणि गावातील शिक्षकांचे मोठे योगदान आहे. जिमलगट्टा गावातील लोक या यशाचे कौतुक करत आहेत. एका साध्या शेतकरी कुटुंबातील मुलाने एवढे मोठे यश मिळवल्याने हा यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

फॉलो करा.

Advertisement

Advertisement

मोदींच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी शिंदेंनी विकास निधीतील पैसे वाटले-अंबादास दानवे

 

वाशीमच्या जिल्हाधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे बंजारा म्युझियमचे लोकार्पण झाले. त्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या दबावाखाली विकास निधीचा पैसा मिंध्यांच्या कार्यक्रमाला वाटणाऱ्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपालांकडे केली आहे.

अंबादास दानवे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र दिले आहे. ५ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी मिंधे सरकारने प्रचंड पैसा उघळला होता. वाशीमचे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांनी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे असलेला २ कोटी ७९ लाख रुपयांचा विकास निधी विकास

अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र

कामांवर खर्च न करता त्यातील ८५ लाख ६० हजार रुपये इतका निधी पालकमंत्र्यांच्या दबावाखाली अन्य जिल्ह्यातील विविध ३३ तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना पोहरादेवीतील मोदींच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी अप्रत्यक्षरीत्या दिला, असे दानवे यांनी या पत्रात नमूद केले आहे. ही बाब गंभीर असून शासनाच्या विकास निधीचा अपव्यय करून जिल्हाधिकारी यांनी कार्यकक्षा ओलांडत पालकमंत्र्यांना गर्दी जमविण्यासाठी मदत केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यांनी या कार्यक्रमासाठी नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथील एसटीच्या व्यवस्थापकांकडे १८५० गाड्यांची मागणी केली होती. इतक्या गाड्या एकाच दिवशी एकाच कार्यक्रमासाठी लावल्या गेल्याने सामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला, असेही दानवे यांनी या पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले आहे.

एकनाथराव जाधव यांचा ठाम निर्णय -विधानसभा लढविणारच !

राज्यात १५ ऑक्टोबर रोजी आचारसंहिता बिगुल वाजला आणि सर्वांच लक्ष वेधल गेल ते म्हणजे वैजापूर च्या राजकीय वलयात चर्चेत असलेल्या चेहऱ्यांकडे महायुती कडून आपणच उमेदवार राहू असेही एकनाथ राव जाधव
यांनी आपल्या दौऱ्यावेळी सांगितले. कि, काहीही झाल तरी आपण विधानसभा लढविणारच… असा प्रण केला आहे.


२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजप-शिवसेना पक्षाची महायुती होती, यावेळी वैजापूर-गंगापूर विधानसभेत स्व.लोकनेते आर.एम.वाणी साहेबांच्या मदतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रा.रमेश बोरनारे यांना
उमेदवारी दिली होती .

त्यावेळी शिवसेना आणि भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ताकद लावत बोरनारे यांना लाख मतानी आमदार केले.मात्र आपल्या संवाद यात्रेदरम्यान भाजप कार्यकारिणी सदस्य एकनाथ जाधव
यांनी भाजप कार्यकर्त्यांना विचारात न घेतले गेल्याने आम्ही हि निवडणूक लढविणारच असा प्रण केला आहे.यामुळे तिकीट मिळाले तर पक्षाकडून नाही मिळाले तर अपक्ष अशी भूमिका एकनाथ जाधव यांनी घेतली आहे.

आगामी काळात उमेदवारी अर्ज भरतानाच हे स्पष्ट होईल कि,कि कोण उमेदवार कुठल्या पक्षाच्या चिन्हावर लढणार?
मात्र सध्या दिसत असलेले चित्र ,पाहता, डॉ. दिनेश परदेशी हे महाविकास आघाडीकडून लढू शकतात. तर विद्यमान आमदार हे महायुतीच्या तिकिटावर लढू शकतात.याशिवाय जाधव हे अपक्ष असतील का यावर लवकरच शिक्कामोर्तब
होणार आहे. याशिवाय माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिकटगावकरांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

मावळत्या मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करण्याचा प्रयत्न

 मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या चौफेर विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतले गेले आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्यातील बळीराजा हा कसा सुखी होईल, त्याची चिंता कशी मिटेल, याचा सांगोपांग विचार करून ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ जाहीर करण्यात आली असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना निश्चितपणे काय फायदे देता येतील, याचा विचार मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला.

सिंचनासाठी शेतकऱ्यांना नेहमीच विजेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सरकारने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024’ ची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत एप्रिल 2024 पासून 7.5 HP म्हणजेच 7.5 अश्‍वशक्तीपर्यंतच्या क्षमतेच्या कृषी पंपाचा वापर करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील साधारण 44 लाख शेतकऱ्यांना मोफत विजेची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ही योजना जाहीर करताना राज्यातील शेतकऱ्यांना पुढील लाभ मिळतील, याचा विचार केला गेला. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या सिंचनासाठी मोफत वीज प्रदान केली जाईल. मोफत विजेचा लाभ त्याच शेतकऱ्यांना मिळेल, जे त्यांच्या शेतात 7.5 HP कृषी पंपाचा वापर करतात. मोफत वीज मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाची बचत होणार आहे, आणि हा लाभ राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकरी स्वावलंबी व्हावा, हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे नेहमीच धोरण आहे आणि त्यामुळे पीक सिंचन संबंधातील सर्व समस्या कमी होणार आहेत

अधिक पेरणी आणि सिंचनासाठी शेतकऱ्याना प्रोत्साहित करणे, यासाठी राज्य सरकार नेहमीच सतर्क आणि सज्ज असते, हे राज्यातील प्रत्येक शेतकरी जाणतो, त्यामुळेच या योजनेला मोठे यश मिळाले आहे.

या योजनेचा लाभ पाच वर्षांसाठी म्हणजेच एप्रिल 2024 पासून मार्च 2029 पर्यंत दिला जाणार आहे. या बदल्यात महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारकडून महावितरण कंपनीला 14 हजार 760 कोटी रुपये देण्यात येतील, असा निर्णय देखील शिंदे सरकारने घेतला आहे.

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी सहा हजार 985 कोटी रुपये आवंटित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वीज दरांमध्ये सवलत देण्यासाठी अतिरिक्त 7 हजार 775 कोटी रुपये दिले गेले आहेत.

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी घेतलेले हे निर्णय दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहेत

वैजापूर विधानसभेत निवडून गेलेले आजपर्यंतचे आमदार ! भावी कोण ?

आरोप प्रत्यारोपात वैजापूरच राजकारण घिरट्या घालतंय
पण तुम्हाला माहितेय का या वैजापूर विधानसभेच्या वलयात आत्तापर्यंतचे निवडून गेलेले आमदार

वैजापूर मध्ये आर एम वाणी हे शिवसेनेत गेले आणि कैलास आबांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला. यांवेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची मते विभागली गेली.कैलास आबाचा पराभव करत आर एम वाणी यांनी शिवसेनेचा भगवा फडकविला. यांमुळे शिवसेनेचा बालेकील्ला अशी वैजापूरची नवी ओळख निर्माण झाली. त्यानंतर शिवसेनेन पंचायत समिती, जिल्हा परीषदही काबीज केली. असे सांगितले परंतु स्वबळावर पक्ष निवडणूका लढविण्याचा विचारामुळे पुन्हा आर एम वाणींना ही निवडणूक लढवावीच लागली.
चिकटगांवकरांना राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली. बक्कळ मतदार वर्ग,भाऊ कैलास आबांची मिळालेली साथ आणि शेवटी नशिबाने साथ दिल्याने भाऊसाहेब तात्या निवडून आले आमदार झाले.


तरीही ठाकरे वाणींकडेच आग्रही होते. परंतु आर एम वाणी यांचा शब्द शास्वत सत्य होता.आपल्या उमेदवारीवर पाणी सोडत त्यांनी बोरनारे यांनाच विधानसभा उमेदवार घोषीत करण्यास ठाकरेंना भाग पाडलं. यातच भाऊसाहेब तात्या आणि अभय पाटील या काका पुतण्यांत राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली. राजकीय वादंग नको म्हणत तात्यांनी माघार घेतली आणि अभय पाटील विरूद्ध रमेश बोरनारे यांच्यात ही फाईट झाली. भाजप ने दिलेली मजबूत साथ आणि शिवसेना कार्यकर्त्यांचा तगडा हाथ यांमुळे बोरनारे 98183 मते घेऊन आमदार झाले. अभय पाटलांना 40 हजाराच्या आसपास मते मिळाली.

माञ आता राज्यात शिवसेना दोन झाल्या.एक ठाकरेंची दुसरी शिंदेंची दोन वर्षांपुर्वी बोरनारे यांनी शिंदेंची साथ देत.ठाकरेंना सोडलं. यांवेळी ही शिंदेसेना आणि भाजप एकञित लढण्याची चिन्हे दिसत असताना महायुतीचा उमेदवार बोरनारेच असतील यात शंका नाही पण यांवेळी भाजपकडून बोरनारेंना तालुक्यात फारशी मदत होणार नाही असा सल्ला जाणकारांकडून व्यक्त होत असतानाच भाजपचे प्रदेश कार्यकारीनी सदस्य एकनाथ जाधव यांनी साखरेत मिठाचा खडा टाकत तिकीट भाजपाला मिळणार असल्यांचे संकेत देत बोरनारेंवर भाजप नाराज असल्याच स्पष्ट केल.

दुसरीकडे भाजपचा तालुक्यातील सर्वात शक्तिशाली आणि सर्व जाती धर्माच्या जनतेला कायम न्याय देत असलेला नेता ठाकरेंच्या गळाला लागणार या बातमीने राजकीय वलयात खळबळ माजवलीय. दररोज काहीतरी नविन ट्विस्ट येत असल्याने या निवडणूकीत बोरनारे यांना चितपत करण्यासाठी शिवसेनेकडून तगड्या उमेदवाराच्या शोधात असलेले ठाकरे यांवेळी शिवसेनेकडून डॉ दिनेश परदेशिंना मैदानात उतरविन्याच्या तयारीत आहेत. असे झाल्यास टफ फाईट पहायला मिळेल.

एकूनच मतदारसंघात यावेळी काय घडत यांकड लक्ष लागलेल असताना भाऊसाहेब तात्या चिकटगांवकर आणि एकनाथ जाधव यांच्या लढतीवरही काही गणित बदलू शकतात ..
शिंदेच्या साथीला जात बोरनारेंनी दगा केल्याचा राग उद्धव ठाकरेंना असल्याने ठाकरे मतदार संघ आपल्या ताब्यात ठेवण्याकरीता नेमके आणखी कुठले गेम प्लान करतात आणि आपला साथीदार पराभूत होऊ नये याकरीता शिंदे काय योजना आखतात हे पहाण औत्सुक्याचे ठरणार आहे.

एकंदरीत सर,भाऊ तात्या,अन साहेबांशिवाय आणखी कोण रिंगणात उतरणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.

सुप्रिया ताई मला फक्त १५ दिवस द्या, मी बघतो त्यांच्याकडे ………

मुंबई | मुंबईतील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना सहन कराव्या लागाणाऱ्या त्रासाचा प्रत्यय काल खा.सुप्रिया सुळे यांनाही आला. रेल्वेने प्रवास करत असताना दादर रेल्वे स्थानकावर एका दलालाने सुप्रिया सुळे यांच्याबरोबर गैरवर्तन केले. आपल्याच टॅक्सीत बसावं असं या दलालाचं म्हणणं होतं. एवढेच नाही तर त्याने त्यांचा रस्ता अडवण्याचाही प्रयत्न केला. याबाबतची माहिती सुप्रिया सुळे यांनी ट्विटर वरुन रेल्वे मंत्रालयाला दिली.

यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितिन नांदगावकर यांनी फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये बोलताना त्यांनी सांगितले ताई मला फक्त पंधरा दिवस द्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर एकही दलाल किंवा टॅक्सीवाला दिसणार नाही. यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाला पंधरा दिवसाचा अवधी दिला असुन कारवाई न झाल्यास आपण आपल्या स्टाईलने प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले.

मुंबईमध्ये टॅक्सीचालक व दलालांची चालु असलेली अरेरावी या घटनेतुन समोर येते. पोलीस व प्रशासनाचा वरदहस्तच अशा घटनांचा कारणीभूत आहे. एका महिला खासदाराला अशा त्रासाला सामोरे जावे लागते तर सामान्य नागरिकांच्या बाबतीत काय घडत असेल? असा प्रश्न समोर येतो.

सुपरस्टार अमिताभ यांनी कॉलेज जीवनातील किस्सा सांगून जाग्या केल्या जुन्या आठवणी !

मुंबई | अमिताभ म्हंटल की आठवतो, शेहनश्या, खुदा गवाह, जंजिर, अशी किती सिनेमांची नावे घ्यावीत.

ह्याच अमिताभ यांच्या कॉलेज जीवनातील आठवणी जेंव्हा ते स्वतः प्रेक्षकांना सांगतात त्यावेळी त्यांच्या तोंडून ती ऐकणं म्हणजे पर्वणी असते.असाच भन्नाट अनुभव कोण बनेगा करोडपती च्या शो दरम्यान आला यावेळी अमिताभ यांनी जुन्या आठवणी जाग्या केल्या.

दिल्ली मद्ये विद्यार्थी असताना ते तीन सुंदर मुलींच्या सोबत बस मद्ये जात होतो. ही बस संसद आणि कॅनॉट प्लेस च्या बाजूने महाविद्यालयात जात असे.

बऱ्याच दिवसांनी ज्या वेळी मी महाविद्यालयातुन पदवी घेऊन बाहेर पडलो आणि नोकरी करू लागलो त्यावेळी त्या तिघी मधली एक मला भेटली जी माझ्या कॉलेज जीवनात बस मधील सहप्रवासी होती.

पुढे बोलताना बिग बी म्हणलेकी त्या महिलेने सांगितलं की माझी एक झलक पाहण्यासाठी ती तिचा मित्र प्राण याच्या सोबत उभी असायची. ज्या वेळी बस यायची त्या वेळी महिलेच्या मनात असा विचार यायचा की प्राण जाये पण अमिताभ न जाये.अस ही बिग बी नि सांगितलं.

सध्या बिग बी आपला कोण बनेगा करोड पती चा ११वा सिजन होस्ट करत आहेत.हा रीयल्टी शो सोनी टीव्ही वर प्रसारित होत आहे.

error: कृपया बातमी कॉपी करू नये.